अस्पृश्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या पुणे कराराची पूर्ण माहिती

....डॉ. आंबेडकरांच्या बौध्दिक लढ्याचे फळ म्हणून ब्रिटीश सरकारच्या जातीय निवाड्याने अस्पृश्यांना जीवनरक्षक 'राजकिय हक्क' दिले होते. परंतु....... पुणे करार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी शीतयुद्धाची खरी सुरुवात लेख थोडा विस्तृत आहे. पण विषय संपूर्ण समजून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचवा ही विनंती आहे... अस्पृश्यांचा महान नेता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या उद्धारासाठी अस्पृश्यांना राजकिय हक्क मिळणे अतिशय महत्वाचे आहे असा पक्का विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा झाला होता. त्यासाठी ब्रिटिश सरकारकडून हे हक्क मिळवायचेच असा त्यांचा निश्चय झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या कामटी भागात अस्पृश्यांची पहिली राजकिय परिषद ८-९ ऑगस्ट १९३० रोजी भरविली. बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून अस्पृश्यांना आपला उद्धार कसा करून घ्यावा आणि त्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन केले. याच काळात ब्रिटिश सरकार हिंदुस्थानातील वसाहतीच्या स्वराज्याचा राज्यकारभार ( ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य ) देण्याचा विचारात होते. या राज्यघटनेत अस्पृश्यांनाही...