पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती ? काय आहे सत्य ?

इमेज
१ जानेवारी १८१८ च्या कोरेगाव - भीमा लढाईत पेशवे किंवा इंग्रज यांच्यापैकी कुणीही ही लढाई जिंकलं अथवा हरलं नाही अशी गोप्यस्फोट करणारी माहिती इतिहास संशोधक चंद्रकांत शामराव पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी समितीपुढे बुधवारी मांडली आहे.  चंद्रकांत पाटील यांनी पुरावा म्हणून शेकडो पानांसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कोलकाता हायकोर्टाचे माजी सरन्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीपुढे सुनावणी सुरू आहे. कोरेगाव भीमाची लढाई बडोद्याच्या गायकवाडांचे मंत्री गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची हत्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांनी घडवल्यावरून झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. ही लढाई कुठल्याही जाती वा धर्माशी संबंधित नव्हती असे सांगतानाच पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आलेली ५०० महार व पेशव्यांचे २८ हजार सैनिक यांच्यात झाल्याची माहिती संशयास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.  महार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली झाली, त्यामुळे त्यांचा १८१८ च्या लढाईत सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही . असा दावा पाटील यांनी केला आहे. गेले पाच महिने आपण जयस्तंभाश...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

इमेज
आजपासून १०२ वर्षापूर्वी १९१७ ला कॉग्रेस पक्ष आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार झाला. या करारात मुसलमानांना जास्तीतजास्त हक्कांच्या सवलती देउन त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कॉंग्रेस पक्षाने मान्य केली होती. " भाषावार प्रांतरचनेचे तत्व स्विकारून बंगाल, पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य सरहद्द प्रांत हे मुसलमान बहुसंख्याक होतील आणि त्या प्रांतात राहणारे हिंदू हे अल्पसंख्याक होतील आणि ते तिथे सुरक्षित राहू शकणार नाही. त्यांच्यावर अत्याचार होतील. अशा प्रकारची प्रांत रचना हिंदुस्थानच्या दृष्टीने धोकादायक आहे. असे मत  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले होते. कारण हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज राहत नसून दोन भिन्न संस्कृतीची राष्ट्रे नांदत आहेत" असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. "हिंदुस्थानाच्या एका बाजुला चीन आणि जपान ही राष्ट्रे तर दुसऱ्या बाजुला अफगाणिस्तान अशी मुस्लिम राष्ट्र आहे. भविष्यात जर चीन किंवा जपानने हिंदुस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर देशाच्या रक्षणासाठी हिंदू - मुसलमान एकजुटीने प्रतिकार करतील ..... पण .... पण जर अफगाणिस्तानने...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हुतात्मा छत्रपती'

इमेज
"मराठ्यांनी आपल्या शत्रूविरूध्द चालू केलेल्या क्रांतीयुध्दाच्या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करीत असता मराठ्यांचा हा राजा 'निधनाच्या क्षणात परिस्थितीचा प्रतिमल्लच नाही तर विजेता झाला !'                     - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हुतात्मा छत्रपती' संभाजी महाराजांवरील लेखाचे खंडण मंडण थोर क्रांतिकारक, हिंदुत्ववादी विचारवंत, राष्ट्रीय इतिहासकार व साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या 'हिंदुपदपादशाही' ( १९२८ ) या गाजलेल्या ग्रंथातील छत्रपती संभाजी महाराजांवरील एक लेख 'हुतात्मा छत्रपती' यावर अनेक स्वा. सावरकरद्रोही लोकांनी त्या लेखातील एक दोन शब्दांवरुन गदारोळ माजवून स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काहीबाही पसरवायला सुरुवात केली आहे. त्या लेखामागील पार्श्वभूमीवर  कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांनी १९९० साली प्रकाशित केलेल्या 'छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ' या संशोधनपर ग्रंथात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या लेखासंबधी विचारपूर्वक खंडण मंडण केले ...

दलवाईं तुमचे डोके ठिकाणावर आहे काय ?

इमेज
नाणार - आरे यातील आंदोलन आणि भीमा कोरेगावची हिंसक दंगल दोन्ही एकच कसे ?  महाराष्ट्रात नव्याने सत्तेत आलेले सरकार हे जरी शिवसेनेच्या मुख्यमंत्री नेतृत्वाखाली उभं राहिलेले असले तरी त्याला अनेक पक्षांनी टेकू दिला आहे. जो तो पक्ष आपआपला स्वार्थ काढून घेण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मग ते पद असो की त्यांचा छुपा अजेंडा ..... ऐकेबाजुला कॉंग्रेस - राष्ट्रवादी असे सर्वधर्मसमभाव मानणारे पक्ष तर दुसरीकडे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना असं पूर्णपणे विरूध्द विचारांची ही आघाडी किती दिवस टिकेल हा प्रश्न आहेच .... पण जितके दिवस टिकेल त्यातही आपला मुद्दा आपला स्वार्थ कसा काढून घेता येइल यावरच भर असेल असेच वाटत आहे ... अशावेळी जितेंद्र आव्हाड आणि हुसेन दलवाई आपल्या मागण्या घुसवत पुढे आलेले दिसून आले. या दोघांनी नाणार आणि आरे आंदोलकांवरील ठाकरे सरकारने मागे घेतलेल्या गुन्हाच्या हवाला देत भीमा - कोरेगाव दंगल प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे. यावेळी हुसेन दलवाईसारख्या बुजुर्ग राजकारणी व्यक्तीकडे पाहून विचार येतो की, ...