पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ही राजकीय खेळी अशी असेल तर ?

इमेज
राजकारणातील  चाणक्य .... राजकारण म्हटल की हा शब्द सर्रासपणे वापरला जातो. जो तो राजकीय पक्ष आपआपली राजकीय खेळी खेळत असतो. काहींची खेळी नावाजली जाते तर काहींची सपशेल फसतेही. सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला राजकीय खेळी म्हणायचं की महाराष्ट्रासाठी न भुतो न भविष्यती अस काही वाईट घडत आहे हेच भल्याभल्यांच्या लक्षात येत नाहीय. भाजपावाले मोदी आणि शहांना चाणक्य म्हणून गौरवत आहेत. तर राष्ट्रवादीवाले शरद पवारांचा तसा उल्लेख करत आहेत. या सर्व खेळात  शिवसेना अडकलीय. नक्की कोण सेनेचा वापर करत आहेत हे अजून शिवसेनेच्या लक्षात येत नाहीय.  भाजपाला जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ मिळाली होती तेव्हा त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केल्यासारख "आम्ही विरोधी बाकावर बसणार" म्हणत शिवसेना - राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची अनैसर्गिक यूती होउ दिली. शिवसेनेच्या हातातून सर्व सुत्र निघून गेली होती. आता सुत्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी खासकरून शरद पवारांच्या हातात आली. शरद पवार साहेब हे असं व्यक्तीमत्व आहे ज्यांना हा देश अजूनही समजू शकला नाहीय. ते काय करतील काही नेम नाही. आणि घडलही तसच .... बैठकावर बैठ...

बंद दाराआड भाजपा - सेनेत काय ठरलं होतं ?

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकपुर्वी प्रसार माध्यमांसमोर "आमच्यात असं ठरलं आहे की, पद आणि जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप केले जाणार आहे !" असं जाहीर वक्तव्य केले होते ... गेले काही दिवस ओल्या दुष्काळासोबतच मुख्यमंत्री पदावरून आरोप प्रत्यारोपाच्या सरी महाराष्ट्रभरात सुरु आहेत. कालपरवा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की,  "निवडणुकीच्या प्रचारावेळी आम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे जाहीरपणे सांगत होतो. तेव्हा शिवसेनेने विरोध का नाही केला ? त्यांनी यावर आक्षेप का नाही घेतला ?" हाच मुद्दा अनेकजण मांडत आहेत. जर पंतप्रधान मोदीजींनी, भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आणि भाजपाच्या सर्वच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हेच भाजपाचे मुख्यमंत्री असतील हे बोलत असताना दुसरीकडे शिवसेना मुख्यमंत्री पदाबाबत काहीच बोलताना दिसत नव्हती हे उभ्या महाराष्ट्राने पाहिल आहे ... मग तेव्हा शांत बसणारी सेना आणि त्यांचे नेते आजच मुख्यमंत्री शिवसेनेचा अस म्हणत पुढे का आले ? जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निकालानंतर प्रसार माध्यमांशी ब...

शिवसेना - भाजपा काय असेल वादाचे मुख्य कारण ?

इमेज
अडीच अडीच वर्षाचा दिलेला शब्द का पाळला नाही ? कारण आजच्या घडीला उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणे हे भाजपाला झेपणारे नाही... गेले अनेक दिवस शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे कुठेच जाहीरपणे काही बोलत नाहीय .. कुठल्याही मिडिया समोर ते प्रतिक्रिया देत नाहीय. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडायला हवी पण ते कुठेच समोर न येता त्यांच्या बाजूने शिवसेनेची भूमिका मांडत आहेत संजय राऊत..... संजय राऊत हे मिडियासमोर रोज येतात पण ते एकच मुद्दा मांडत आहेत ... "ठरलेले करा आणि मुख्यमंत्री पदाबद्दल बोला !" काल परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यात असं काही ठरलं नव्हतचं .. !" अस जाहीरपणे बोलल्यामुळे उध्दव ठाकरे दुखावले गेले. यालाही कारण आहे ते म्हणजे अमित शहांनी दिलेला शब्द मुख्यमंत्री तो दिलाच नाही अस म्हणत आहेत .. दुखावलेले उध्दवजी म्हणाले की, "अमित शहांनी जो मला शब्द दिला होता तो त्यांनी पाळावा ... त्यांनी त्यांचा शब्द फिरवू नये ... " काय होता तो शब्द नक्की ? उध्दवजी ठाकरे हे संजय राऊत यांच्या मुखातून म्हणतात की,  "तो ...