पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भिडे गुरुजींचे 'त्या' धारकऱ्याबद्दलचे 'ते' मत

इमेज
आदरणीय श्री. संभाजीराव भिडे गुरुजी हे नाव महाराष्ट्राला नविन नाही. त्यांच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे कार्य उभ्या महाराष्ट्रात सुरु आहे. तरुणांमध्ये श्रीशिवछत्रपती - श्रीसंभाजीमहाराज रुजवण्याचे काम त्यांचे धारकरी अत्यंत तळमळीने करत असतात. या संघटनेत पद पैसा आणि प्रसिद्धी या गोष्टीना अजिबात थारा नाही. संपूर्ण वर्षभरातील त्यांचे उपक्रम ठरलेले आणि नियोजित असतात.  भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यात येउन ज्यांना अनेक वर्षे झाली असे मुंबई विभागाचे प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिलेली ही माहिती   "२०१८ ... ठाण्यातील बैठकीसाठी मुंबईतून आदरणीय गुरुजींना घेऊन मी ठाण्यात एका धारकरी बंधूच्या घरी पोहचलो.  मुंबईतून आलेल्या धारकऱ्यांनी जेवण करून घेतलं... पण गुरुजींनी "माझा आज उपवास होता तो आज सकाळीच सुटला आता मी अन्नप्राशन करणार नाही  !" असं ठामपणे म्हटले आणि एका बाजूला वर्तमानपत्र वाचत बसले. थोडा निवांत वेळ मिळताच मी गुरुजींच्या समोर बसलो... अनेक दिवसांची घालमेल त्यांच्यासमोर मांडली..... "गुरुजी, मुंबईची जबाबदारी माझ्याकडून काढून कोणा दुसऱ्याव...

रायगड असाही पहावा

इमेज
.....असे अगणित क्षण ज्या गडाने पाहिले.. जो या अमुल्य इतिहासाचा भाग आहे... नाही ती अविभाज्य घटना आहे... असा हा रायगड ...      कर्नाटकाच्या स्वारीवर जाण्यापुर्वी सोयराबाईंनी शिवछत्रपतींकडे संभाजीराजे आणि राजाराम यांना एकत्र रायगडावर ठेवू नका म्हणून सुचविले होते. सोयराबाईचे हे म्हणणे महाराजांना पटणारे नव्हते पण ... नाईलाजाने त्यांनी ते मान्य केले आणि कर्नाटकात निघण्यापूर्वी महाराजांनी सभा भरविली. महाराज सिंहासनावर बसलेले असताना युवराज संभाजीराजे तिथे गेले. शंभूराजांनी आपल्या वडिलांच्या पायावर डोके टेकवले. महाराजांनी त्यांना आपल्या जवळ बसण्याचा आग्रह केला. पण राजनीतीचा अभ्यास केलेले संभाजीराजे त्यांच्या बाजूला बसले नाही. शिवछत्रपतींनी आपल्या ज्येष्ठ मुलाकडे पाहात म्हणाले, "बाळा, मला हे राज्य कसे मिळाले ते ऐक. माझे बुध्दीमान वडील शहाजीराजे माझी सामुद्रिक लक्षणे पाहून श्रेष्ठ राजनीतीचा विचार असल्यामुळे त्यांनी मला उद्देशून म्हणाले ,  "मोठे असले तरी हे राज्य मला पुरेसे नाही. तेव्हा तू अन्य राज्याच्या प्राप्तीसाठी उद्योगाला लागले पाहिजेस. माझी इतरही मुले आहेत. त्...

किल्ले रायगडावरील 'त्या' अपरिचित तोफा

इमेज
  गेली २० वर्षे सातत्याने किल्ले रायगडावर जाणारे शिवचरित्र अभ्यासक बळवंतराव दळवी यांनी स्वतः किल्ले रायगडावर पाहिलेल्या त्या सर्व अपरिचित तोफांची माहिती देताना आमच्या प्रतिनिधींशी केलेला हा संवादपर माहिती लेख... "वि.वा. जोशी यांचे १९२९ साली लिहिलेल्या   'राजधानी रायगड' या पुस्तकात रायगडावरील तोफांविषयी लिहिलेले आहे. त्यांना १४ ते १५ तोफा  रायगडावर  आढळल्या होत्या. त्यानंतर १९६२ साली शा. वि. आवळस्कर यांच्या 'रायगडाची जीवनकथा' या पुस्तकात १७ तोफांविषयी जुजबी माहिती आहे. गो. नी. दांडेकर यांनी १९६५ साली लिहिलेल्या ' शिवतीर्थ रायगड ' या पुस्तकात त्यांनी रायगडावरील १५ तोफांविषयी बरीच व्यवस्थित आणि विस्तृत माहिती लिहिलेली आहे. आज रायगडावर १५ तोफा दिसतात.   परंतु शिवकालात बहुत तोफा असल्या पाहिजेत. बहुधा त्यातील बऱ्याचशा इंग्रज आणि पोतुगीजांकडून घेतलेल्या असाव्यात. इंग्रज - पोतुगीजांकडील तोफा चांगल्या उत्तम घडणींच्या असतात हे शिवछत्रपतींना माहित होते. नसत्या गोष्टीत स्वदेशीचा अभिमान धरण्याइतके ते हेकट कधींच नव्हतें.  तोफांनी स...

महात्मा फुले आणि १९ फेब्रुवारीची शिवजयंती

इमेज
ज्यांना शिवभारतावर विश्वास नाही, जे जेधे शकावली मानत नाही पण जे महात्मा जोतिराव फुलेंना मानतात त्यांच्यासाठीच हा छोटा लेख मांडत आहे. लेख पूर्ण वाचूनच आपले मत मांडावे ही नम्र विनंती राहिल. आज अनेक जण इंग्रजी तारखेनुसार श्रीशिवछत्रपतींची जयंती साजरी करताना १९ फेब्रुवारीला पहिल्यांदा शिवजयंती साजरी करणारे म्हणून महात्मा फुलेंचा उल्लेख करतात . आणि हे पटवून देण्याकरिता एका चित्रपटातील video दाखवला जातो त्यात महात्मा फुलेंनी १९ फेब्रुवारी १८६९ ला पहिली शिवजयंती साजरी केल्याचं दाखवलं, सांगितले जातं. पण ..... आता स्वतः महात्मा जोतिराव फुले त्यांनी शिवछत्रपतींवर लिहिलेल्या पोवाड्यात काय लिहितात हे पाहू .... पंधराशे एकूण पन्नास साल फळलें  जुन्नर ते उदयांशी आले | शिवनेरी किल्ल्यांमध्यें बाळ शिवाजी जन्मलें जिजीबाइस रत्न सापडलें || १८६९ साली लिहोलेल्या या पोवाड्यात महात्मा फुले शिवजन्माचा उल्लेख करतात तो १५४९ चा. इथे १५४९ हे शिवजन्माचे इंग्रजी साल नसून ते शालिवाहन शके १५४९ या शिवजन्माच्या हिंदू तिथीचे वर्ष आहे  . आणि जुन्या किंवा पारंपरिक शिवजयंतीचे साल १६२७ आणि शके...

शिवछत्रपतींच्या सुवर्ण सिंहासनाची आज गरज काय ?

इमेज
हा प्रश्न अनेकांकडून सातत्याने शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना विचारला जातो. सोबतच 'असा निधी एकत्र करून गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवे, गोरगरिबांना मदत करायला हवी' वैगरे वैगरे मतप्रवाह अनेकांकडून व्यक्त झालेले दिसून आले आहे.  यावर आम्ही मुंबईतील धारकरी आणि शिवचरित्राचे अभ्यासक बळवंतराव दळवी यांच्याशी यासंदर्भात विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, "शिवछत्रपतींनी त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते विधिवत सिंहासनाधिश्वर छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाने ज्यांना बळाने बाटवून मुसलमान केले होते अशा नेतोजी पालकरांना शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वधर्मात घेतले. हे शिवछत्रपतींनी का केलं असावं ? दुसऱ्या बाजूला महाराजांनी आपल्या व्यावहारात घुसलेले परकीय शब्द काढून टाकून आपले शब्द वापरता आणण्यासाठी 'राज्यव्यवहारकोश' तयार केला. हा राज्यव्यवहारकोश महाराजांनी का तयार केला ? उत्तर फार सोपं आहे ....  शिवाजी महाराज मुसलमानी जुल्मी सत्तेविरूद्ध लढून छत्रपती राजे झाले होते त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आहे आणि स्वतःची सत्ता आल्यावर जर आपण आपल्य...

शिवजयंतीचा वाद का ?

इमेज
प्रत्येक मराठ्याने हे वाचायला हवंच ! आजचे मराठे शिवकाळातील मराठा सरदारांनी सांगितलेल, लिहिलेलं वाचत नाही, समजून घेत नाही हे दुर्दैव आहे ! कान्होजी जेधे  म्हणजे शिवकाळातील एक मातब्बर सरदार घराणे. शहाजीराजांच्या सोबत अनेक लढाया लढलेले कान्होजी जेधे. शहाजीराजांच्या हुकुमावरून पुण्यात शिवछत्रपतींच्या सेवेत रुजु झालेल्या कान्होजी जेध्यांना कोण ओळखत नाही ? अफजलखानाच्या वेळी खानास मदत करा असा आदिलशाही फर्मान आलेला असतानाही शिवरायांच्या सोबत उभे राहून आदिलशाहीने दिलेल्या वतनावर पाणी सोडलेले मातब्बर सरदार म्हणून कान्होजी जेधे इतिहासात प्रसिद्ध आहेत. या जेध्यांच्या शिवकाळातील इतिहास प्रसिद्ध मराठा सरदाराच्या वंशपरंपरागत ऐतिहासिक नोंदी त्यांच्या  जेधे शकावली व जेधे करिनात  आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांच्या सत्य नोंदी आपल्याला या शकावलीत सापडतात इतके हे महत्वाचे साधन. या मराठा सरदाराच्या ऐतिहासिक नोंदवहीत शिवछत्रपतींच्या जन्माची नोंद लिहिलेली आहे. ती नोंद अशी शके १५५१ शुक्ल संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीया या हिंदू कालगणनेनुसारच ही नोंद आहे. माझ्यासारख्या सामान्य मरा...

रायगडावरील 'त्या' तिकीट घराला शिवभक्तांनी दाखवले टकमक टोक

इमेज
आणि अशा तऱ्हेने शिवभक्तांचा राग अनावर झाला ... काही दिवसांपुर्वी रायगडावर प्रीवेडींग शूटची घटना उघड करताना पुरातत्व विभागाचा गोंधळ कारभार बाहेर आला आणि त्या वेळी शिवभक्त धारकरी आणि श्रीछत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव समितीचे पदाधिकारी श्री. सिध्देश सुर्वे यांनी पुरातत्व विभागाला जाब विचारला होता, 'रायगडावर जाण्याकरता २५ रुपये प्रवेश शुल्क घेतले जात होते, गडावर पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही, स्वच्छता गृहांची व्यवस्था नाही मग हे पैस का आणि कशा करता ?'  या मागणीकडे शिवसेनेचे आमदार आमदार मा. श्री. भरतशेठ गोगावले यांनी लक्ष देवुन आज चित्तदरवाजापाशी असणाऱ्या त्या तिकीटघराला उखडून दरीत फेकुन देत यापुढे असा कोणतेच तिकीट शिवभक्तांकडून आकारु नये अशी सख्त ताकीद पुरातत्व खात्याला दिली. तसेच महाराष्ट्रातील सगळ्या शिवभक्तांचे होणारे हाल लक्षात घेऊन गडावरील वेळ मर्यादा हटवुन किल्ले रायगड हा शिवभक्तांसाठी वर्षाचे १२ महीने २४ तास खुला असावा अशा मागणीला सुद्दा आमदार साहेबांनी सहमती देत गडावर राहण्याच्या बंदीचा नियम लवकरच हटवन्याची मागणी केली आहे.   ...