पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेकडो पाकिस्तानी आणि खलिस्तानवाद्यांना नडला एकटा भारतीय

इमेज
जर्मनीत भारताविरोधात आणि खलिस्तानच्या मागणीसाठी पाकिस्तानी आणि खलिस्तानवाद्यांनी शेकडोंच्या संख्येंने एकत्र येउन मोर्चा काढला होता. पण या मोर्चाला हाती तिरंगा घेउन एक भारतीय नडला. काश्मीरच्या मुद्यावर जगसमोर तोंडावर आपटल्यानंतर आता पाकिस्तानकडून खलिस्तानवादी आंदोलकांना पाठबळ देण्याचे पुन्हा प्रयत्न सुरु आहेत. परदेशातील पाकिस्तानी नागरीक खलिस्तानीवाद्यांना पाठिंबा देण्यासाठी जर्मनीत १५ ऑगस्ट रोजी खलिस्तानसाठी रॅली काढली होती.   या मोर्चाला प्रशांत वेंगुर्लेकर या भारतीयाने एकट्याने सामोरे जाताना आपल्या हाती भारताचा तिरंगा घेऊन "बाप बाप होता है" अशी अभिमानाने प्रतिउत्तर देणारा त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  भारताला विरोध दर्शविण्यासाठी शेकडोंच्या संख्येने मोर्चेकरी तिथे असताना  प्रशांत वेंगुर्लेकर हा भारतीय मोर्चा जात असलेल्या रस्त्यावर एकटा उभा राहून 'भारत माता की जय, सारे जहां से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' सारख्या घोषणा देत उभा होता. या घोषणांमुळे काही मोर्चेकरी त्याच्या अंगावरही धावून गेले. काही मोर्चेकऱ्यांनी घेराव करण्याचा, हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित...

तिसरी पिढी

इमेज
असं म्हणतात की, एखाद्या थोर व्यक्तीची  'तिसरी पिढी' त्या व्यक्तीचे ध्येयधोरणे, त्या व्यक्तीचा लढा, त्या व्यक्तीचे कार्य जसेच्या तसे पुढे नेण्यात असमर्थ ठरते किंवा मग त्या थोर व्यक्तीच्या विचारांच्या विरोधात जाते .  याला असंख्य उदाहरणे आहेत. अगदी श्रीशिवछत्रपती ते शाहू महाराज हा इतिहास पाहिल्यावर आपल्याला हे दिसून येते. शाहू महाराज यांनी आपली राजधानी कोणत्याही किल्ल्यावर न करता साताऱ्यात ते स्थायिक झाले आणि तिथेच आपली राजधानी केली. किल्ले रायगडाचे महत्व कमी होउ लागले ते यानंतरच .... मराठ्यांची सत्ता अटकेपार गेली पण त्यात साताऱ्याचे शाहू महाराजांचा प्रत्यक्ष  सहभाग किती ते अभ्यासल्यावर तुम्हाला लेखकाला काय म्हणायचं आहे हे समजेल कारण पुढचा इतिहास सर्वांना ठाऊक आहेच ...  सध्या देशात गांधी घराण्यातील कॉंग्रेसचा अध्यक्ष कोण यावरून मोठा गदारोळ माजला आहे. इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी पण त्यांच्या नंतर तिसरी पिढी मात्र कमकुवत निघाली. राहुल गांधींना आपल्या वडिलांसारख, आपल्या आजी सारख कॉंग्रेस संभाळणे वाढवणे जमत नाहीय याचा प्रत्यक्ष पुरावा उभा देश पाहात आहे. असेच एक महाराष्ट्र...

मुसलमानांची धर्मनिष्ठा आणि हिंदू

इमेज
" तुम्ही कॉंग्रेसी, राष्ट्रवादीचे असाल किंवा भाजपाई ... जेव्हा तुम्ही त्यांच्या भावना दुखावता तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही फक्त काफिर हिंदू असता ..... " मुसलमानांसारखी धर्मनिष्ठा हिंदू कधी शिकणार ? शिर्षक वाकून भुवया उंचाबल्या असतील तर थांबा. मुसलमान त्यांच्या धर्माशी, त्यांच्या कुराणाशी, त्यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबरांशी नेहमीच निष्ठावंत राहिला आहे या मताला पुष्टी देणारे अनेक प्रसंग दाखले म्हणून देता येइल. अनेकवेळेला शहर, राज्य, प्रांत, देश यापलीकडे जाऊन मुसलमान त्यांच्या लोकांकरता एकत्र येतो, रस्त्यावर उतरतो याचेही अनेक दाखले देता येइल. चेहरा ओळखीचा असो नसो, आपला नातेवाईक मित्र असो नसो पण दाढी आणि डोक्यावर गोल टोपी आहे हे पाहताच कोणत्याही संकटात दुसऱ्या मुसलमानाला मदत करण्यासाठी पुढे आलेले मुसलमान आपण आजही आपल्या अवतीभवती पाहत असतो. हे काय आहे ? हे असं का होतं असा जर प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर सोपे आहे ... मुसलमान हा त्याच्या धर्माशी, त्याच्या कुराणाशी  पक्की निष्ठा ठेवणारा असतो. उभ्या जगात तो कुठेही असला तरी जेव्हा त्याच्या धर्माला त्याची गरज भासते तेव्हा तो कोणताही...

गर्व है... हम हिंदू है !

इमेज
". ...त्यामुळे राम मंदिरचे महत्त्व आमच्यासाठी काय आहे हे शब्दांत सांगणे कठीण"                                                                   - बाळा नांदगावकर                                             ( नेते - मनसे )                  आज श्रीराममंदिराचे भूमिपूजन होत आहे, करोडो लोकांचे , अनेक पिढ्यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात येत आहे. परंतु हा दिवस येण्यामागे लाखो लोकांचा संघर्ष आहे, आणि मला अतिशय गर्वाने नमूद करावेसे वाटते की त्यात माझा ही खारीचा वाटा आहे. मुंबई महापालिकेचा नगरसेवक असतांना १९९२ मधे बाळासाहेबांच्या आदेशाने आम्ही त्यावेळचे सहकारी नगरसेवक सुभाष कांता पाटील, दिगंबर कादंरकर, जयवंत परब, के पी नाईक, श्रीकांत सरमळकर, विलास अवचट, विश्वनाथ नेरुरकर, अनंत भ...

श्रीराम मंदिराचा मनाचा मोठेपणा दिसावा

इमेज
किमान ५०० - ५५० वर्षाचा इतिहास पुन्हा बदलला जाणार आहे. याधी हा इतिहास गुजरातच्या सोरटी सोमनाथ या मंदिराबाबत घडला आहे. हिंदुस्थानाला लुटायला आलेला गझनीचा मुहम्मद याने सोमनाथचे मंदिर तोडून फोडून टाकले होते ते मंदिर पुनच्छ स्वतंत्र हिंदुस्थानात सरदार वल्लभभाई पटेल यांनी  पंडित जवाहरलाल नेहरु यांची पर्वा न करता त्याच दिमाखात ते मंदिर उभं केल्याचा इतिहास आहे ........ असाच एक लुटारू बाबरने श्रीरामांचे जन्मस्थान उध्द्वस्त करून त्या ठिकाणी मस्जिद उभारली. दुर्दैवाने इतिहासात ती मस्जिद पुन्हा पाडून श्रीरामांचे मंदिर उभं करण्याच सामर्थ्य तेव्हा कोणातही नव्हतं.. ६ डिसेंबर १९९२ रोजी हजारों श्रीराम भक्त कारसेवकांनी बाबरी मस्जिद उध्वस्त केली आणि संपूर्ण भारतात त्यानंतर हिंदू - मुस्लिम दंगल उसळल्या. या दंगलीची सर्वात जास्त झळ बसली ती मुंबईला. ६ डिसेंबरला सुरु झालेले युध्द १२ मार्च १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोटापर्यंत सुरुच होत. त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थान शांत होता पण मुंबई मात्र जळत होती....  मुंबई दंगलीत शेकडो हजारो लोकं मृत्यूमुखी पडली होती. बॉंबस्फोटाने हादरुन गेलेल्या मुंबईने श्रीराम मंदिरास...