पोस्ट्स

Temple लेबलसह पोस्ट दाखवत आहे

श्रीराम मंदिराचा मनाचा मोठेपणा दिसावा

इमेज
किमान ५०० - ५५० वर्षाचा इतिहास पुन्हा बदलला जाणार आहे. याधी हा इतिहास गुजरातच्या सोरटी सोमनाथ या मंदिराबाबत घडला आहे. हिंदुस्थानाला लुटायला आलेला गझनीचा मुहम्मद याने सोमनाथचे मंदिर तोडून फोडून टाकले होते ते मंदिर पुनच्छ स्वतंत्र हिंदुस्थानात सरदार वल्लभभाई पटेल यांनी  पंडित जवाहरलाल नेहरु यांची पर्वा न करता त्याच दिमाखात ते मंदिर उभं केल्याचा इतिहास आहे ........ असाच एक लुटारू बाबरने श्रीरामांचे जन्मस्थान उध्द्वस्त करून त्या ठिकाणी मस्जिद उभारली. दुर्दैवाने इतिहासात ती मस्जिद पुन्हा पाडून श्रीरामांचे मंदिर उभं करण्याच सामर्थ्य तेव्हा कोणातही नव्हतं.. ६ डिसेंबर १९९२ रोजी हजारों श्रीराम भक्त कारसेवकांनी बाबरी मस्जिद उध्वस्त केली आणि संपूर्ण भारतात त्यानंतर हिंदू - मुस्लिम दंगल उसळल्या. या दंगलीची सर्वात जास्त झळ बसली ती मुंबईला. ६ डिसेंबरला सुरु झालेले युध्द १२ मार्च १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोटापर्यंत सुरुच होत. त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थान शांत होता पण मुंबई मात्र जळत होती....  मुंबई दंगलीत शेकडो हजारो लोकं मृत्यूमुखी पडली होती. बॉंबस्फोटाने हादरुन गेलेल्या मुंबईने श्रीराम मंदिरास...

हिंदूंची मंदिरे का तोडली जातात ? कारणे व उपाय

इमेज
मंदिरे ही हिंदूंची अस्मिता आहे आणि या अस्मितेला कोणत्याही प्रकारचा धक्का बसला की निश्चितच  आपल्याला त्याचा राग येतो. बऱ्याचदा हिंदूंच्याच चुकीमुळे अनेक वेळा प्राचीन मंदिरेही महानगरपालिका / सरकार / विकासकाकडून तोडली जातात. आपल्या शेजारील, विभागातील एखाद्या मंदिराला नोटीस आली की मग आपली धावपळ सुरू होते, आणि हाती निराशा येते. या विषयाबाबत भरपूर दिवस अभ्यास करत होतो त्यानुसार या लेखात काही कारणे सांगणार आहे आणि त्यावर उपायही सांगणार आहे ... तेंव्हा लेख पूर्ण वाचा. आपल्या विभागातील जुन्या मंदिरांना नोटिस का येतात त्याची  कारणे  -- प्रथमतः मंदिर आणि घर यात फार मोठा फरक असतो. काही चांगले सज्जन, धार्मिक लोक आपल्या घरात /घराजवळ एखाद्या जागेत /एखाद्या पवित्र ठिकाणी /झाडाखाली एखादया प्राचीन मूर्तीची स्थापना करतात. आणि मग त्या देवांची तिथे पूजा अर्चा करतात. आता निश्चित अशा प्रकारे स्थापना करणारे जे धार्मिक घराणं आहेत त्या काळात मंदिराबाबत कोणतीही कागदपत्रे ठेवत नाहीत, त्यांच्यासमोर तसा प्रश्न उद्भवत नाही. मग त्यांची हयात संपली की त्यांच्या पुढील पिढीस ते सर्व हस्तांतरित करतात. ...