पोस्ट्स

balwantrao लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गडावर भेटणारा तो अनोळखी गडी

इमेज
आपल्याला कुठे जायचे आहे. कुठल्या मार्गाने जायचे आहे. यांचे आणि आपले नाते नक्की कधी जुळले ? काय आहे हे नातं ? कोण आहेत की निष्ठावंत साथ देणारी आणि तुमच्याकडून काहीच अपेक्षा न ठेवणारी  ? गडाचा सगळा घेरा, त्यांच्या वाटा सर्व काही यांना आधीच ठाऊक असल्यासारखं, गडावरील प्रत्येक ठिकाण यांना ठाऊक असते. कोण असतात ही.....                गडावर भेटणारा तो अनोळखी गडी           --------------------------------------                                          - बळवंतराव दळवी ओळख नाही पाळख नाही न त्याला आपण स्वतःहून गडकिल्ल्यावर जातानाचा संदेश दिला असतो. पण जणू आपण गडावर येणार हे त्याला आधीच कोणी सांगितलेलं !  कधी तो फार पुढे तर कधी वाट बघत दुरुन आपल्याकडे लक्ष ठेवू असतो. आपण थोडा विसावा घेतो. तो लगेच आपल्या जवळ येतो. आपल्याकडे पाहतो. जणू म्हणत असतो,  "चाला बिगीन बिगीन लैय चढ हाय अजून." तो पुढे असल्याने आपल्याल...

किल्ले रायगडावरील 'त्या' अपरिचित तोफा

इमेज
  गेली २० वर्षे सातत्याने किल्ले रायगडावर जाणारे शिवचरित्र अभ्यासक बळवंतराव दळवी यांनी स्वतः किल्ले रायगडावर पाहिलेल्या त्या सर्व अपरिचित तोफांची माहिती देताना आमच्या प्रतिनिधींशी केलेला हा संवादपर माहिती लेख... "वि.वा. जोशी यांचे १९२९ साली लिहिलेल्या   'राजधानी रायगड' या पुस्तकात रायगडावरील तोफांविषयी लिहिलेले आहे. त्यांना १४ ते १५ तोफा  रायगडावर  आढळल्या होत्या. त्यानंतर १९६२ साली शा. वि. आवळस्कर यांच्या 'रायगडाची जीवनकथा' या पुस्तकात १७ तोफांविषयी जुजबी माहिती आहे. गो. नी. दांडेकर यांनी १९६५ साली लिहिलेल्या ' शिवतीर्थ रायगड ' या पुस्तकात त्यांनी रायगडावरील १५ तोफांविषयी बरीच व्यवस्थित आणि विस्तृत माहिती लिहिलेली आहे. आज रायगडावर १५ तोफा दिसतात.   परंतु शिवकालात बहुत तोफा असल्या पाहिजेत. बहुधा त्यातील बऱ्याचशा इंग्रज आणि पोतुगीजांकडून घेतलेल्या असाव्यात. इंग्रज - पोतुगीजांकडील तोफा चांगल्या उत्तम घडणींच्या असतात हे शिवछत्रपतींना माहित होते. नसत्या गोष्टीत स्वदेशीचा अभिमान धरण्याइतके ते हेकट कधींच नव्हतें.  तोफांनी स...

न विसरता येणारा 'अभ्यास' ...

इमेज
इयत्ता ४ थीत असताना पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची गाठ पडली....  पहिल्याच पानावर राजे घोड्यावर बसलेले आणि सोबत मावळे असे चित्र आजही आठवते. इतिहासाचे संपुर्ण पुस्तकच महाराजांचा पराक्रम सांगत होतं. शौर्य, धैर्य, बुध्दिमत्ता, चातुर्य, लढाऊपणा, सर्व काही अगदी एखाद्या दैवी कथेप्रमाणे पानापानावर ओसंडून वाहत होतं. शिवरायांचे बालपण, शिवनेरी किल्ल्यावरील राजांचे जन्मस्थानाचा फोटो, रायरेश्वर मंदिरात बेलपत्र वाहून बालशिवबाने घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहताना आपल्यालाही मावळा वाहयाचं होतं ते चित्र आठवते का ? अफजलखानाने हात पसरुन राजांना दिलेलं आलिंगन आणि राजांनी काढलेला कोथळा हे वाचताना त्या बालवयातही हाताच्या मुठ्या आवळल्या जायच्या. आग्र्याच्या दरबारातील तो प्रसंग बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, हे शिवरायांनी आम्हाला जगावं कसं हे शिकवलं.  गड आला पण सिंह गेला हा धडा वाचत असताना तानाजीसाठी शिवरायांना हळहळताना वाचून डोळ्यांच्या पापण्या ओल्या वाहायच्या ....... त्या वयातच शिवराय मनात घर करुन राहिले. आजही माझ्या ऐतिहासिक पुस्तकांच्या...

या शिलालेखात सम्राट अशोक काय लिहितात ?

इमेज
सम्राट अशोकांचा ९ वा शिलालेख हा शिलालेख इ.स. पुर्व ( ख्रिस्त पुर्व ) ३ ऱ्या शतकातील आहे.  मुंबई जवळ असणाऱ्या अत्यंत प्राचिन  सोपारा ( आजच्या विरार जवळील नालासोपारा ) या ठिकाणचा हा शिलालेख आहे ! सोपारा ( आजचे नालासोपारा ) याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आजही उपलब्ध आहेत. सदर शिलालेख हा इ. स. पुर्व ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकाने धर्मप्रचारासाठी  मौर्य ब्राम्ही लिपीत लिहिलेला आहे. यात असं लिहिल आहे की, सम्राट अशोक असे म्हणत आहे की.... "रोगराई, विवाह, जन्म, यात्रा याप्रसंगी सामान्य ( हिंदू ) माणसे अनेक धार्मिक विधी करतात. ( धार्मिक विधी फक्त हिंदू धर्मात होतात ) अशावेळी माता आणि पत्नी अनेक धार्मिक विधी करतात. ( हिंदू स्त्रिया आजही हे करतात ) शिलालेखात सम्राट अशोक पुढे लिहितात ... " … धार्मिक विधी निश्चित कराव्यात   ( अस अशोक सम्राट म्हणतात  ) पण याच्या सोबतच ( धार्मिक विधी सोबतच ) सदाचाराचे फळ चांगले मिळते.   ( सदाचार म्हणजे चागले आचार / विचार ) पुढे लिहिल आहे की ... बंदी, दास - दासी यांना माणुसकीने वागविणे. ज्येष्टांचा आदर करावा पशुपक्षांवर दया दाखवणे....