पोस्ट्स

bhima koregav लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती ? काय आहे सत्य ?

इमेज
१ जानेवारी १८१८ च्या कोरेगाव - भीमा लढाईत पेशवे किंवा इंग्रज यांच्यापैकी कुणीही ही लढाई जिंकलं अथवा हरलं नाही अशी गोप्यस्फोट करणारी माहिती इतिहास संशोधक चंद्रकांत शामराव पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी समितीपुढे बुधवारी मांडली आहे.  चंद्रकांत पाटील यांनी पुरावा म्हणून शेकडो पानांसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कोलकाता हायकोर्टाचे माजी सरन्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीपुढे सुनावणी सुरू आहे. कोरेगाव भीमाची लढाई बडोद्याच्या गायकवाडांचे मंत्री गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची हत्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांनी घडवल्यावरून झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. ही लढाई कुठल्याही जाती वा धर्माशी संबंधित नव्हती असे सांगतानाच पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आलेली ५०० महार व पेशव्यांचे २८ हजार सैनिक यांच्यात झाल्याची माहिती संशयास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.  महार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली झाली, त्यामुळे त्यांचा १८१८ च्या लढाईत सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही . असा दावा पाटील यांनी केला आहे. गेले पाच महिने आपण जयस्तंभाश...

दलवाईं तुमचे डोके ठिकाणावर आहे काय ?

इमेज
नाणार - आरे यातील आंदोलन आणि भीमा कोरेगावची हिंसक दंगल दोन्ही एकच कसे ?  महाराष्ट्रात नव्याने सत्तेत आलेले सरकार हे जरी शिवसेनेच्या मुख्यमंत्री नेतृत्वाखाली उभं राहिलेले असले तरी त्याला अनेक पक्षांनी टेकू दिला आहे. जो तो पक्ष आपआपला स्वार्थ काढून घेण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मग ते पद असो की त्यांचा छुपा अजेंडा ..... ऐकेबाजुला कॉंग्रेस - राष्ट्रवादी असे सर्वधर्मसमभाव मानणारे पक्ष तर दुसरीकडे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना असं पूर्णपणे विरूध्द विचारांची ही आघाडी किती दिवस टिकेल हा प्रश्न आहेच .... पण जितके दिवस टिकेल त्यातही आपला मुद्दा आपला स्वार्थ कसा काढून घेता येइल यावरच भर असेल असेच वाटत आहे ... अशावेळी जितेंद्र आव्हाड आणि हुसेन दलवाई आपल्या मागण्या घुसवत पुढे आलेले दिसून आले. या दोघांनी नाणार आणि आरे आंदोलकांवरील ठाकरे सरकारने मागे घेतलेल्या गुन्हाच्या हवाला देत भीमा - कोरेगाव दंगल प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे. यावेळी हुसेन दलवाईसारख्या बुजुर्ग राजकारणी व्यक्तीकडे पाहून विचार येतो की, ...

संभाजीराव भिडे गुरुजी यांची डिगरी आणि शिक्षण

इमेज
भिडे गुरुजींच्या शिक्षणाविषयी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यावर त्यांच्या धारकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया BBC मराठी आणि TV9 वाल्यांनी कोणतीही पुर्ण  माहिती न घेता कुठल्यातरी अर्धवट माहितीवर फेकाफेकी केली...  मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिलेली प्रतिक्रिया...  "ज्यांनी ६०- ७० वर्षापुर्वी संन्यस्त जीवन जगायच आणि फक्त देव देश आणि धर्मासाठी कार्य करायच अस ठरवून आपलं घर त्यागलं... आपले नातेवाईक त्यागले ... असलेली नसलेली संपत्ती सोडून दिली ... संन्यस्त जगायच म्हणून पायात काहीही न घालता अनवाणी फिरतात ... ज्यांच्याकडे स्वतःच अस काही नाही.... जे दुसऱ्याने दिलेल्या १० बाय १० च्या घरात राहतात .... इतकचं काय तर ज्या घरात राहताय त्याला साधं कुलुपही लावत नाही....  ज्यांनी देव देश धर्मासाठी सर्वस्व त्यागले आहे अशा त्यागी ... योगी ... शिवतपस्वी महनीय व्यक्ती ६० - ७०  वर्षापुर्वीचे  आपले शिक्षणाचे सर्टिफिकेट सोबत घेउन फिरतील असा विचारच काहींच्या डोक्यात येतो कसा ?? आज ती सर्टिफिकेट असली काय आणि नसली काय त्याने आदरणीय गुरुजींना मानणाऱ्या लाखों धारकऱ्यांना त्याने का...

रावणाची स्टटंबाजी आणि दलित बांधवांची दिशाभूल

इमेज
रावणाचा स्टंटपणा आणि दलित बांधवांची दिशाभूल उत्तर प्रदेश मधील सहारनपुर येथे झालेल्या जातीय दंगलीचा मुख्य सुत्रधार आणि आरोपी असलेला चंद्रशेखर आझाद उर्फ रावण याला १४ महिन्यांची शिक्षा झाली होती.   असा हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला रावण अचानकपणे ऐन १ जानेवारीच्या तोंडावर महाराष्ट्रातील कोरेगांव भीमा येथील विजयस्तंभ स्मारकाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रात येण्याचा आग्रह धरतो काय आणि त्याला मिडिया डोक्यावर घेते काय ......  सगळचं आधीच प्रिप्लान ठरल्याप्रमाणे घडतं ! या रावणाने २०१४ ला एक नवीन संघटना सुरु केली. त्याचा मुख्य उद्देश हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष आणि त्यांना २०१९ ला सत्तेपासून रोखणे. याबद्दल हा रावण जाहीरपणे हे बोलतोही. आधीच दलित बांधव वेगवेगळ्या संघटनांच्या गराड्यात अडकलाय आणि याने आणखी एक वेगळी संघटना सुरु केली. काय तर म्हणे बहुजनांचे एकत्रीकरण करायचे आहे. हा काल मुंबईत आला. याने आग्रह धरला की याला वरळीत सभा घ्यायचीय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी याला परवानगी नाकारली. तशी परवानगी पोलीस अनेकांना अनेक कारणामुळे नाकारतात. पण पुन्हा ठरवल्याप्रमाणे...

दलित बांधवांना सत्य समजलं ?

इमेज
दलित बांधवांना सत्य समजलं ? आंबेडकरी चळवळीशी ज्यांची नाळ जोडली गेलीय असे अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते नेहमीच समाजासोबत देशहिताचा विचार करताना आढळतात. त्यांना राजकारणापेक्षा दलित हित जास्त महत्त्वाचे वाटते म्हणूनच की काय त्यांना काही राजकारणी लोक नेहमीच दूर ठेवतात.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खऱ्या अर्थाने मानणारा दलित समाज कधीच राजकीय लोकांच्या राजकारणाला बळी पडला नाही. तो नेहमीच आपल्या तत्वाला धरून आंबेडकरी चळवळ सुरु ठेवत राहिला, जपत राहिला ! समाज हितासोबतच देशहित महत्त्वाचे हे जाणूनच १ जानेवारी २०१८ ला झालेली ( ठरवून केलेली ) कोरेगाव - भीमा दंगलीला महाराष्ट्रातील दलित बांधवांनी महाराष्ट्रभरात पसरू दिले नाही. या दंगलीला जबाबदार म्हणून ज्यांची नावे समोर आली होती ते संभाजीराव भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात एकही सबळ ठोस पुरावा नसतानाही काहींनी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला वेठीस धरून महाराष्ट्राचे करोडो रुपयाचे नुकसान करून महाराष्ट्राची संपत्ती जाळून भस्मसात केली. का ? तर त्यांना महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य हवे होते म्हणून....  ही गोष्ट महाराष्ट्रातील द...

प्रकाश आंबेडकरांनी घातलं भिडे गुरुजींच्यासमोर सपशेल लोटांगण ?

इमेज
प्रकाश आंबेडकरांनी घातलं भिडे गुरुजींच्यासमोर सपशेल लोटांगण ?           कोरेगाव - भीमा दंगलीनंतर संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या विरोधात जिवाचे रान करून भिडे गुरुजींनीच ती दंगल भडकवली अशी वल्गना करणारे... मुंबईसह महाराष्ट्रभरात बंद पुकारून महाराष्ट्राच्या करोडों रुपयांची होळी करायला दलित बांधवांना उकसवणारे भारीपचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी १ जानेवारी ते १० नोव्हेंबर अशी एकूण ११ महिने संभाजीराव भिडे गुरुजींच्या विरोधात गरळ ओकुन महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता ? काल जेव्हा कोरेगाव - भीमा चौकशी आयोगासमोर आंबेडकरांची चौकशी झाली तेव्हा मात्र प्रकाश आंबेडकरांनी एकदाही भिडे गुरुजींचे नाव घेतले नाही न त्यांना दंगलीचे सुत्रधार म्हटले. अगदी पूर्णपणे घुमजाव करत भिडे गुरुजींच्या विषयी सपशेल लोटांगण घातले असेच म्हणावे लागेल ... पत्रकारांनी यासंबंधी विचारले असता, " सार्वजनिक ठिकाणी, सभेत लोकांना समोर बोलणे वेगळे आणि चौकशी आयोगासमोर बोलणे वेगळे !" अशी जाहीर कबुली दिल्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे असे घुमजाव पाहून पत्रकारांमध...

भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न फसला

इमेज
. ... आणि मिडियाची चोरी पकडली गेली !           पत्रकार, पत्रकारिता आणि Media म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असा प्रचार आणि प्रसार अनेक वर्ष सुरु आहे. अनेक पत्रकारांनी त्यांच्या लेखणीने सुवर्णकाळ गाजवलेला आहे. प्र. के. अत्रे पासून ते अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या अग्रलेखाने भल्याभल्यांना दरदरुन घाम सुटलेला आम्ही पाहिला आहे. याच पत्रकारितेची दुसरी बाजू म्हणजे त्यांनी भल्या भल्या मोठ्या नेत्यांचे स्टिंग ओपरेशन करुन त्यांची खोटी बाजू उघड केलेली आपण आजतागायत पाहिली आहे.  आज त्याच्या उलट एक किस्सा घडला....  *** Now पत्रकार अरुनील **** ( नाव लवकरच उघड करु ) यांनी श्रीशिवप्रतिष्ठानचे मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांना फोन करून 'कोरेगाव - भिमा प्रकरणात अनिता साळवे यांनी ८ महिन्यानंतर पुन्हा एकदा भिडे गुरुजी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रिटिशन दाखल केली यावर आपल मत मांडा' म्हणून विचारणा केली. '८  महिन्यापूर्वी घडलेल्या दंगलीच्या घटने संदर्भात महाराष्ट्र सरकारने म्हणजेच मान. मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत सत्य सांगितले आहे आता त्यावर...

नाण्याच्या दोन बाजू

इमेज
पाहण्यासारख्या - नाण्याच्या दोन बाजू एका बाजूला अफाट पैसा आणि घृणा तर दुसऱ्या बाजूला अपार निष्ठा आणि श्रद्धा मुंबईसह महाराष्ट्रभरात एक विषय गेले काही महिने वादग्रस्त बनून राहिला आहे. तो म्हणजे १ जानेवारी रोजी कोरेगाव - भीमा येथे घडलेली नियोजनपुर्ण दंगल आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी ! कोरेगाव - भीमात दंगल घडली आणि त्याचे पडसाद ३ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्रात उमटले. या दंगलीला जबाबदार म्हणून काही नावे समोर आली ते म्हणजे सांगलीचे संभाजीराव भिडे गुरुजी आणि पुण्याचे मिलिंद एकबोटे यांचे. भिडे गुरुजी हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची संघटना चालवणारे भिडे गुरुजी उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. छत्रपती श्रीशिवाजी महाराज आणि छत्रपती श्रीसंभाजी महाराज या दोन महाराष्ट्राच्या आराध्यदैवतांभोवती कार्य करणारी संघटना म्हणून ओळख ! कोरेगाव भीमा दंगलीत संभाजीराव भिडे गुरुजींचे नाव यात येताच त्यांच्या विरोधात महाराष्ट्रभरात रान उठवल गेलं.  काहींनी सांगितले की, "मी भिडे गुरुजींना दगड मारताना पाहिल." काहींनी म्हटल की "दंगलीला संभाजी भिडे गुरुजी जबाब...