पोस्ट्स

ही राजकीय खेळी अशी असेल तर ?

इमेज
राजकारणातील  चाणक्य .... राजकारण म्हटल की हा शब्द सर्रासपणे वापरला जातो. जो तो राजकीय पक्ष आपआपली राजकीय खेळी खेळत असतो. काहींची खेळी नावाजली जाते तर काहींची सपशेल फसतेही. सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला राजकीय खेळी म्हणायचं की महाराष्ट्रासाठी न भुतो न भविष्यती अस काही वाईट घडत आहे हेच भल्याभल्यांच्या लक्षात येत नाहीय. भाजपावाले मोदी आणि शहांना चाणक्य म्हणून गौरवत आहेत. तर राष्ट्रवादीवाले शरद पवारांचा तसा उल्लेख करत आहेत. या सर्व खेळात  शिवसेना अडकलीय. नक्की कोण सेनेचा वापर करत आहेत हे अजून शिवसेनेच्या लक्षात येत नाहीय.  भाजपाला जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ मिळाली होती तेव्हा त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केल्यासारख "आम्ही विरोधी बाकावर बसणार" म्हणत शिवसेना - राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची अनैसर्गिक यूती होउ दिली. शिवसेनेच्या हातातून सर्व सुत्र निघून गेली होती. आता सुत्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी खासकरून शरद पवारांच्या हातात आली. शरद पवार साहेब हे असं व्यक्तीमत्व आहे ज्यांना हा देश अजूनही समजू शकला नाहीय. ते काय करतील काही नेम नाही. आणि घडलही तसच .... बैठकावर बैठ...

बंद दाराआड भाजपा - सेनेत काय ठरलं होतं ?

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकपुर्वी प्रसार माध्यमांसमोर "आमच्यात असं ठरलं आहे की, पद आणि जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप केले जाणार आहे !" असं जाहीर वक्तव्य केले होते ... गेले काही दिवस ओल्या दुष्काळासोबतच मुख्यमंत्री पदावरून आरोप प्रत्यारोपाच्या सरी महाराष्ट्रभरात सुरु आहेत. कालपरवा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की,  "निवडणुकीच्या प्रचारावेळी आम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे जाहीरपणे सांगत होतो. तेव्हा शिवसेनेने विरोध का नाही केला ? त्यांनी यावर आक्षेप का नाही घेतला ?" हाच मुद्दा अनेकजण मांडत आहेत. जर पंतप्रधान मोदीजींनी, भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आणि भाजपाच्या सर्वच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हेच भाजपाचे मुख्यमंत्री असतील हे बोलत असताना दुसरीकडे शिवसेना मुख्यमंत्री पदाबाबत काहीच बोलताना दिसत नव्हती हे उभ्या महाराष्ट्राने पाहिल आहे ... मग तेव्हा शांत बसणारी सेना आणि त्यांचे नेते आजच मुख्यमंत्री शिवसेनेचा अस म्हणत पुढे का आले ? जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निकालानंतर प्रसार माध्यमांशी ब...

शिवसेना - भाजपा काय असेल वादाचे मुख्य कारण ?

इमेज
अडीच अडीच वर्षाचा दिलेला शब्द का पाळला नाही ? कारण आजच्या घडीला उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणे हे भाजपाला झेपणारे नाही... गेले अनेक दिवस शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे कुठेच जाहीरपणे काही बोलत नाहीय .. कुठल्याही मिडिया समोर ते प्रतिक्रिया देत नाहीय. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडायला हवी पण ते कुठेच समोर न येता त्यांच्या बाजूने शिवसेनेची भूमिका मांडत आहेत संजय राऊत..... संजय राऊत हे मिडियासमोर रोज येतात पण ते एकच मुद्दा मांडत आहेत ... "ठरलेले करा आणि मुख्यमंत्री पदाबद्दल बोला !" काल परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यात असं काही ठरलं नव्हतचं .. !" अस जाहीरपणे बोलल्यामुळे उध्दव ठाकरे दुखावले गेले. यालाही कारण आहे ते म्हणजे अमित शहांनी दिलेला शब्द मुख्यमंत्री तो दिलाच नाही अस म्हणत आहेत .. दुखावलेले उध्दवजी म्हणाले की, "अमित शहांनी जो मला शब्द दिला होता तो त्यांनी पाळावा ... त्यांनी त्यांचा शब्द फिरवू नये ... " काय होता तो शब्द नक्की ? उध्दवजी ठाकरे हे संजय राऊत यांच्या मुखातून म्हणतात की,  "तो ...

हिंदूंची मंदिरे का तोडली जातात ? कारणे व उपाय

इमेज
मंदिरे ही हिंदूंची अस्मिता आहे आणि या अस्मितेला कोणत्याही प्रकारचा धक्का बसला की निश्चितच  आपल्याला त्याचा राग येतो. बऱ्याचदा हिंदूंच्याच चुकीमुळे अनेक वेळा प्राचीन मंदिरेही महानगरपालिका / सरकार / विकासकाकडून तोडली जातात. आपल्या शेजारील, विभागातील एखाद्या मंदिराला नोटीस आली की मग आपली धावपळ सुरू होते, आणि हाती निराशा येते. या विषयाबाबत भरपूर दिवस अभ्यास करत होतो त्यानुसार या लेखात काही कारणे सांगणार आहे आणि त्यावर उपायही सांगणार आहे ... तेंव्हा लेख पूर्ण वाचा. आपल्या विभागातील जुन्या मंदिरांना नोटिस का येतात त्याची  कारणे  -- प्रथमतः मंदिर आणि घर यात फार मोठा फरक असतो. काही चांगले सज्जन, धार्मिक लोक आपल्या घरात /घराजवळ एखाद्या जागेत /एखाद्या पवित्र ठिकाणी /झाडाखाली एखादया प्राचीन मूर्तीची स्थापना करतात. आणि मग त्या देवांची तिथे पूजा अर्चा करतात. आता निश्चित अशा प्रकारे स्थापना करणारे जे धार्मिक घराणं आहेत त्या काळात मंदिराबाबत कोणतीही कागदपत्रे ठेवत नाहीत, त्यांच्यासमोर तसा प्रश्न उद्भवत नाही. मग त्यांची हयात संपली की त्यांच्या पुढील पिढीस ते सर्व हस्तांतरित करतात. ...

भिडे गुरुजींच्या विरोधकांना कोर्टाची चपराक !

इमेज
विषय दंड भरण्याचा नव्हता ... विषय होता न केलेला गुन्हा मान्य करुन आपण असत्याला सत्य का म्हणायच ? १६ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईत शिवडी येथे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या शिवचरित्र आणि सुवर्ण सिंहासनसंदर्भात व्याख्याना वेळी काही संघटनांनी भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी केलेल्या सुचनेनुसार उघड्या मैदानावर व्याख्यान न घेता शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी बंदिस्त सभागृहात हे व्याख्यान घेतले होते. या व्याख्यानात हजारांच्या आसपास शिवभक्त उपस्थित होते.  या व्याख्यानासाठी बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग कार्यालयातून रितसर पैसे भरून परवानगी घेण्यात आली होती. बंदिस्त सभागृहात व्याख्यान असल्याने पोलिसांनीही सहकार्य केले होते. व्याख्यान तीन तास सुरळीत पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी रफी अहमद किडवाई पोलिसांचे आभार मानण्यासाठी एक आभार पत्र पोलिसांना दिले. कायदेशीर मार्गाने आदरणीय भिडे गुरुजींचे आयोजित व्याखानाला विरोध केला होता त्या भीम आर्मी, बहुजन  रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारत एकता मिशन यांच्या विरोधात पोलि...

संभाजीराव भिडे गुरुजी यांची डिगरी आणि शिक्षण

इमेज
भिडे गुरुजींच्या शिक्षणाविषयी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यावर त्यांच्या धारकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया BBC मराठी आणि TV9 वाल्यांनी कोणतीही पुर्ण  माहिती न घेता कुठल्यातरी अर्धवट माहितीवर फेकाफेकी केली...  मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिलेली प्रतिक्रिया...  "ज्यांनी ६०- ७० वर्षापुर्वी संन्यस्त जीवन जगायच आणि फक्त देव देश आणि धर्मासाठी कार्य करायच अस ठरवून आपलं घर त्यागलं... आपले नातेवाईक त्यागले ... असलेली नसलेली संपत्ती सोडून दिली ... संन्यस्त जगायच म्हणून पायात काहीही न घालता अनवाणी फिरतात ... ज्यांच्याकडे स्वतःच अस काही नाही.... जे दुसऱ्याने दिलेल्या १० बाय १० च्या घरात राहतात .... इतकचं काय तर ज्या घरात राहताय त्याला साधं कुलुपही लावत नाही....  ज्यांनी देव देश धर्मासाठी सर्वस्व त्यागले आहे अशा त्यागी ... योगी ... शिवतपस्वी महनीय व्यक्ती ६० - ७०  वर्षापुर्वीचे  आपले शिक्षणाचे सर्टिफिकेट सोबत घेउन फिरतील असा विचारच काहींच्या डोक्यात येतो कसा ?? आज ती सर्टिफिकेट असली काय आणि नसली काय त्याने आदरणीय गुरुजींना मानणाऱ्या लाखों धारकऱ्यांना त्याने का...

रावणाची स्टटंबाजी आणि दलित बांधवांची दिशाभूल

इमेज
रावणाचा स्टंटपणा आणि दलित बांधवांची दिशाभूल उत्तर प्रदेश मधील सहारनपुर येथे झालेल्या जातीय दंगलीचा मुख्य सुत्रधार आणि आरोपी असलेला चंद्रशेखर आझाद उर्फ रावण याला १४ महिन्यांची शिक्षा झाली होती.   असा हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला रावण अचानकपणे ऐन १ जानेवारीच्या तोंडावर महाराष्ट्रातील कोरेगांव भीमा येथील विजयस्तंभ स्मारकाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रात येण्याचा आग्रह धरतो काय आणि त्याला मिडिया डोक्यावर घेते काय ......  सगळचं आधीच प्रिप्लान ठरल्याप्रमाणे घडतं ! या रावणाने २०१४ ला एक नवीन संघटना सुरु केली. त्याचा मुख्य उद्देश हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष आणि त्यांना २०१९ ला सत्तेपासून रोखणे. याबद्दल हा रावण जाहीरपणे हे बोलतोही. आधीच दलित बांधव वेगवेगळ्या संघटनांच्या गराड्यात अडकलाय आणि याने आणखी एक वेगळी संघटना सुरु केली. काय तर म्हणे बहुजनांचे एकत्रीकरण करायचे आहे. हा काल मुंबईत आला. याने आग्रह धरला की याला वरळीत सभा घ्यायचीय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी याला परवानगी नाकारली. तशी परवानगी पोलीस अनेकांना अनेक कारणामुळे नाकारतात. पण पुन्हा ठरवल्याप्रमाणे...